Wednesday, September 18, 2019

गुरु मंत्र - शंतनू जोशी

भित्र्या, आळशी आणि फुकट्या माणसाला आयुष्यात कधीच, कुठल्याच बाबतीत यश मिळू शकत नाही. भित्र्याचा मंगल खराब , आळशी माणसाचा शनी खराब आणि फुकट्या माणसाचा केतू खराब. ज्या माणसाचे पत्रिकेत हे तीन ग्रह शुभ आहेत अश्यानी सुद्धा, जर वरील तीन दुर्गुण आत्मसात केले, तर त्याचे सुद्धा हे तीन ग्रह वाईट फळ द्यायला सुरुवात करतील.
उपाय - गुळाची पोळी बनवून, त्यावर मोहरीचा तेलाचा सात रेघा डाव्या हाताचा मधल्या बोटानी बनवून, मग ती पोळी कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालणे. असे किमान ४३ दिवस करणे. असे केल्यानी वरील दोष जलद कमी होण्यास मदत होईल
अविघ्नमस्तु !
शंतनू जोशी
ज्योतिष शास्त्र , वास्तू शास्त्र आणि अंकशास्त्र सल्लागार
पुणे

Tuesday, September 3, 2019

घोड्याची नाल - अकस्मात धनलाभ का विनाकारण त्रास ? ***शंतनू जोशी***


आपल्या सर्वांनी अनेक घरांचा बाहेर , दुकानाचा बाहेर घोड्याची नाल लावलेली पाहिली असेल. पण ह्या बद्दल संपूर्ण माहिती लोकांना नसते. अनेक लोक कुठून तरी वाचून हा उपाय करत असतात. हा उपाय करणार्यां मध्ये काही लोकांना अकस्मात आणि भरमसाट फायदा झालेला दिसतो, तर काही लोकांना भयंकर नुकसान होताना दिसते. म्हणून काही गोष्टी पुढील प्रमाणे समजून मगच ह्याचा प्रयोग करावा , अन्यथा हा उपाय फार नुकसान कारक ठरू शकतो.

***शंतनू जोशी***
१) घोड्याची नाल शनी ग्रहाचे प्रतीक मानली जाते.
२) ज्या लोकांना शनी कुंडलीत अनुकूल आहे अश्याच लोकांना घोड्याची नाल लाभते , अन्यथा नुकसान देते.
३) घोड्याची नाल फक्त शनीचा अमला खाली येणाऱ्या व्यवसायांसाठीच लाभदायक ठरते, किंवा त्या निगडित नोकरी करणाऱ्यांसाठीच लाभते.
४) घोड्याची नाल हि वास्तविक घोड्यांची वापरलेली नाल असावी लागते. कोणतीही लोखंडाची नाल लावून फायदा होत नसतो.
५) शनी ग्रह आपल्या पत्रिके मध्ये कोणत्या राशीत आणि नक्षत्रात आहे, त्या वरून ठरते कि नाल सिद्ध करण्याची पद्धत कोणती.
६) फॅब्रिकेशन , सट्टा-लॉटरी , चामड्याशी संबंधित व्यवसाय हे शनीशी संबंधित असतात. अजूनही अनेक व्यवसाय शनीचा अमला खाली येतात.
७) घोड्याची वापरलेली नाल मिळवून त्या धातू पासून अंगठी बनवून घातल्यास सुद्धा फायदा होऊ शकतो.

***शंतनू जोशी***
वरील कोणताही मुद्दा चुकल्यास अत्त्यंत खराब परिणाम मिळतात. माझ्या पाहण्यात असे लोक आहेत ज्यांचे चांगले चालणारे व्यवसाय घोड्याची नाल चुकीचा पद्धतीने वापर केल्या मुळे बंद झाले. माझ्या ओळखीतले एक बिल्डर घोड्याची नाल लावल्या नंतर कोर्ट कचेर्यान मध्ये अडकले. त्या मुळे मित्रांनो घोड्याची नाल लावण्याची घाई करू नये. कोणाचे तरी मार्गदर्शन घेऊन मगच ह्या उपायाचा वापर करावा.
चांगले अनुभव - बरोबर पध्दतीनी वापरलेली नाल वापरल्या मुळे एका मुलाला लॉटरी मधून लाभ झाला. योग्य पद्धतींनी सिद्ध केलेली घोड्याची नाल वापरून ,एक सज्जन अनेक वर्ष डुबता असलेला फॅब्रिकेशन चा व्यवसाय चांगल्या पद्धतींनी चालवून पुढील दीड वर्षात कर्ज मुक्त झाले.
***शंतनू जोशी***
ज्योतिष शास्त्र , वास्तू शास्त्र आणि अंक शास्त्र सल्लागार
पुणे


फक्त व्हाट्स अँप - ९५५२५९३९५१

दैनंदिन समस्या निवारण # ८ - शिक्षणात , संपत्तीत आणि विवाहात सतत अडचणी , भांडणं आणि आर्थिक दिवाळे ! - शंतनू जोशी


मनुष्याचा पत्रिकेत एक बुध ग्रह खराब झाला कि माणसाचे आयुष्य हे अत्त्यंत खराब होते. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे , त्या मुळे बुध बिघडला कि माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. माणूस एकापुढे एक चूकीचे निर्णय घेत जातो , खोटे बोलतो , फ्रॉड करतो आणि स्वतःच जाऊन कायद्याचा कचाट्यात सापडतो. अश्या माणसाचे डोके शांत राहू शकत नाही , सतत शंका कुशंका मनामध्ये भुणभुणत असतात.
***शंतनू जोशी ***
स्वतःचा बायको आणि नवऱ्यावर सुद्धा संशय. स्वतःचे चारित्र्य कधीच विकून झालेले असते पण, दुसऱ्याला मात्र उपदेशामृताचे डोस देण्यास हे लोक विसरत नाहीत. सतत ज्यात त्यात चुका शोधणे , स्वतः व्यसनाचा आहारी जाणे. एक प्रकारचा भ्रमिष्टपणा ह्या लोकां मध्ये दिसून येतो. विचित्र स्वप्न सतत पडणे , सारखे आजारी पडणे , विनाकारण चीड चीड आणि तिरसटपणा करणे ही सर्व ह्या लोकांची लक्षण आहेत . असे लोक चार चौघात राजकारण आणि धर्मावर सतत काहीतरी फिलॉसॉफी झोडत असतात. स्वतःचा आयुष्याचे वाजलेले बारा मात्र ह्यांना काही केल्या निस्तरत नाहीत.
***शंतनू जोशी ***
ह्या लोकांना शिक्षण असो अथवा व्यवसाय काही केल्या जमत नाही. घरात वाद आणि बऱ्याचदा मारा मारी पर्यंत गेलेले वाद हे ह्यांचा कडे सामान्य असतात. सतत कर्ज दिवाळखोरी हि ह्यांची नेहेमीची दिनचर्याच बनते. बरं नोकरी करावी तर तिथे सुद्धा वाद , भांडण आणि राजकारण ह्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. बुध ग्रह खराब का चांगला हे नेमकेपणानी तर चांगला ज्योतिषीच सांगू शकतो. पण आपला बुध ग्रह जर मीन किंवा धनु राशीत असेल, किंवा ६,८,१२ घरांमध्ये असेल तर आपल्याला वरील लक्षणं दिसण्याची शक्यता सगळ्यात जास्ती असते.
***शंतनू जोशी ***
उपाय -
१) खोटे बोलू नये
२) दारू , सिगरेट ,बिडी ,तंबाखू-गुटखा व्यसने सोडून द्यावीत
३) फक्त कामापुरतेच बोलावे. वायफळ बडबड आणि खर्च टाळावे.
४) भीमरूपी स्तोत्राचे १२०० पाठ दर वर्षी एकदा तरी करावेत. ६० दिवस रोज २० वेळा म्हणल्यास हे सहज शक्य आहे.
५) अमेथिस्ट क्रिस्टल ची अंगठी हातात जरूर घालावी

***शंतनू जोशी ***
ज्योतिषशास्त्र , अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र सल्लागार
पुणे

९५५२५९३९५१ - फक्त व्हॉट्स ऍप

दैनंदिन समस्या निवारण # ७ - दुकान चालत नाही - शंतनू जोशी


अनेक लोक हातातल्या नोकऱ्या सोडून व्यवसाय सुरु करतात. अनेक जण आजकाल शिक्षण सुद्धा अर्धवट करून घाई घाई मध्ये व्यवसाय उघडतात. अनेक गृहिणी काहीतरी करायच असे म्हणून एखादा घरगुती किंवा दुकान घेऊन व्यवसाय सुरु करतात. आणि कोणताही व्यवसाय सेट व्हायला वेळ हा लागतच असतो. पण अनेक लोक कमी कामात जास्ती पैसे मिळवण्यासाठीच व्यवसायात येतात.

अनेक जण ह्याच लालसेमुळे अनेक चुकीचे निर्णय घेतात. अनेक जण पटकन व्यवसाय उघडतात , कर्ज घेतात आणि जरा परिस्थिती अवघड झाली कि पळ काढतात. काही लोकांची ह्याचा विरुद्ध अवस्था असते. हे लोक कितीही अपयश आले , कर्ज झाली आणि भांडण झाली तरी व्यवसाय सोडत नाहीत. अनेक जण चुकीची partnership करून स्वतः मोट्ठ्या खड्ड्यात उडी मारतात ! मल्टीलेव्हल मार्केटींग स्कीम्स म्हणजे 'तुमचा' व्यवसाय न्हवे ! हा एक प्रकारे दलालीचा व्यवसाय असतो आणि बऱ्याचदा हा फसवाच असतो. पण अनेक भाबडी / मूर्ख ?! लोक ह्या जाळ्यात अडकतात आणि मग अनेक वर्ष कर्जबाजारी होतात.

***शंतनू जोशी ***

१) कधीही कोणताही व्यवसाय सुरु करताना एखाद्या चांगल्या ज्योतिषाला (नामवंत असेलच असे नाही) विचारावे कि मला व्यवसाय suitable आहे का नोकरी ? दुसरी गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्राशी निगडित व्यवसाय करायचा आहे तो सूट होतो का ? भागीदारी करण्यासाठी जो भागीदार बरोबर आहे का ? भागीदारी योग्य आहे का नाही ? हे सर्व विचारूनच पुढे जावे म्हणजे पुढचे अनेक खड्डे चुकवता येतात.

२) दुकानाची वास्तू चेक केल्याशिवाय दुकान घेऊ नये !

३) मोट्ठे लोन घेताना ज्योतिषीय सल्ला घेणे चांगले .

३) दुकानात ईशान्य दिशेला चांदीचा वाटीत गुलाबजल मिश्रित पाणी ठेवून त्यात दक्षिणावर्ती शंख बुडवून ठेवावा.

४) दुकानाचा देव्हाऱ्यात कुबेर , लक्ष्मी , गणेश आणि बालाजी हे फोटो अवश्य ठेवावेत.

५) दुकानाचा गल्ल्यात कार्नेलियन क्रिस्टल चे ५ क्रिस्टल्स ठेवावेत !

६) दैनंदिन समस्या निवारण # २ आणि ५ मध्ये दिलेले उपाय करणे.

७) कोणतेही नवीन निर्णय घेताना शक्यतो नवरा /बायको आणि कामा निगडित व्यक्तींना सोडून कोणालाही त्या बद्दल सांगू नये.

८) आपण करीत असलेले उपासना , उपाय , व्रत वैकल्य इत्यादी लोकान समोर बोलू नयेत.

अविघ्नमस्तु !

शंतनू जोशी
ज्योतिषशास्त्र , अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र सल्लागार

पुणे