Tuesday, September 3, 2019

दैनंदिन समस्या निवारण # ७ - दुकान चालत नाही - शंतनू जोशी


अनेक लोक हातातल्या नोकऱ्या सोडून व्यवसाय सुरु करतात. अनेक जण आजकाल शिक्षण सुद्धा अर्धवट करून घाई घाई मध्ये व्यवसाय उघडतात. अनेक गृहिणी काहीतरी करायच असे म्हणून एखादा घरगुती किंवा दुकान घेऊन व्यवसाय सुरु करतात. आणि कोणताही व्यवसाय सेट व्हायला वेळ हा लागतच असतो. पण अनेक लोक कमी कामात जास्ती पैसे मिळवण्यासाठीच व्यवसायात येतात.

अनेक जण ह्याच लालसेमुळे अनेक चुकीचे निर्णय घेतात. अनेक जण पटकन व्यवसाय उघडतात , कर्ज घेतात आणि जरा परिस्थिती अवघड झाली कि पळ काढतात. काही लोकांची ह्याचा विरुद्ध अवस्था असते. हे लोक कितीही अपयश आले , कर्ज झाली आणि भांडण झाली तरी व्यवसाय सोडत नाहीत. अनेक जण चुकीची partnership करून स्वतः मोट्ठ्या खड्ड्यात उडी मारतात ! मल्टीलेव्हल मार्केटींग स्कीम्स म्हणजे 'तुमचा' व्यवसाय न्हवे ! हा एक प्रकारे दलालीचा व्यवसाय असतो आणि बऱ्याचदा हा फसवाच असतो. पण अनेक भाबडी / मूर्ख ?! लोक ह्या जाळ्यात अडकतात आणि मग अनेक वर्ष कर्जबाजारी होतात.

***शंतनू जोशी ***

१) कधीही कोणताही व्यवसाय सुरु करताना एखाद्या चांगल्या ज्योतिषाला (नामवंत असेलच असे नाही) विचारावे कि मला व्यवसाय suitable आहे का नोकरी ? दुसरी गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्राशी निगडित व्यवसाय करायचा आहे तो सूट होतो का ? भागीदारी करण्यासाठी जो भागीदार बरोबर आहे का ? भागीदारी योग्य आहे का नाही ? हे सर्व विचारूनच पुढे जावे म्हणजे पुढचे अनेक खड्डे चुकवता येतात.

२) दुकानाची वास्तू चेक केल्याशिवाय दुकान घेऊ नये !

३) मोट्ठे लोन घेताना ज्योतिषीय सल्ला घेणे चांगले .

३) दुकानात ईशान्य दिशेला चांदीचा वाटीत गुलाबजल मिश्रित पाणी ठेवून त्यात दक्षिणावर्ती शंख बुडवून ठेवावा.

४) दुकानाचा देव्हाऱ्यात कुबेर , लक्ष्मी , गणेश आणि बालाजी हे फोटो अवश्य ठेवावेत.

५) दुकानाचा गल्ल्यात कार्नेलियन क्रिस्टल चे ५ क्रिस्टल्स ठेवावेत !

६) दैनंदिन समस्या निवारण # २ आणि ५ मध्ये दिलेले उपाय करणे.

७) कोणतेही नवीन निर्णय घेताना शक्यतो नवरा /बायको आणि कामा निगडित व्यक्तींना सोडून कोणालाही त्या बद्दल सांगू नये.

८) आपण करीत असलेले उपासना , उपाय , व्रत वैकल्य इत्यादी लोकान समोर बोलू नयेत.

अविघ्नमस्तु !

शंतनू जोशी
ज्योतिषशास्त्र , अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र सल्लागार

पुणे

No comments:

Post a Comment