Tuesday, September 3, 2019

दैनंदिन समस्या निवारण # ८ - शिक्षणात , संपत्तीत आणि विवाहात सतत अडचणी , भांडणं आणि आर्थिक दिवाळे ! - शंतनू जोशी


मनुष्याचा पत्रिकेत एक बुध ग्रह खराब झाला कि माणसाचे आयुष्य हे अत्त्यंत खराब होते. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे , त्या मुळे बुध बिघडला कि माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. माणूस एकापुढे एक चूकीचे निर्णय घेत जातो , खोटे बोलतो , फ्रॉड करतो आणि स्वतःच जाऊन कायद्याचा कचाट्यात सापडतो. अश्या माणसाचे डोके शांत राहू शकत नाही , सतत शंका कुशंका मनामध्ये भुणभुणत असतात.
***शंतनू जोशी ***
स्वतःचा बायको आणि नवऱ्यावर सुद्धा संशय. स्वतःचे चारित्र्य कधीच विकून झालेले असते पण, दुसऱ्याला मात्र उपदेशामृताचे डोस देण्यास हे लोक विसरत नाहीत. सतत ज्यात त्यात चुका शोधणे , स्वतः व्यसनाचा आहारी जाणे. एक प्रकारचा भ्रमिष्टपणा ह्या लोकां मध्ये दिसून येतो. विचित्र स्वप्न सतत पडणे , सारखे आजारी पडणे , विनाकारण चीड चीड आणि तिरसटपणा करणे ही सर्व ह्या लोकांची लक्षण आहेत . असे लोक चार चौघात राजकारण आणि धर्मावर सतत काहीतरी फिलॉसॉफी झोडत असतात. स्वतःचा आयुष्याचे वाजलेले बारा मात्र ह्यांना काही केल्या निस्तरत नाहीत.
***शंतनू जोशी ***
ह्या लोकांना शिक्षण असो अथवा व्यवसाय काही केल्या जमत नाही. घरात वाद आणि बऱ्याचदा मारा मारी पर्यंत गेलेले वाद हे ह्यांचा कडे सामान्य असतात. सतत कर्ज दिवाळखोरी हि ह्यांची नेहेमीची दिनचर्याच बनते. बरं नोकरी करावी तर तिथे सुद्धा वाद , भांडण आणि राजकारण ह्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. बुध ग्रह खराब का चांगला हे नेमकेपणानी तर चांगला ज्योतिषीच सांगू शकतो. पण आपला बुध ग्रह जर मीन किंवा धनु राशीत असेल, किंवा ६,८,१२ घरांमध्ये असेल तर आपल्याला वरील लक्षणं दिसण्याची शक्यता सगळ्यात जास्ती असते.
***शंतनू जोशी ***
उपाय -
१) खोटे बोलू नये
२) दारू , सिगरेट ,बिडी ,तंबाखू-गुटखा व्यसने सोडून द्यावीत
३) फक्त कामापुरतेच बोलावे. वायफळ बडबड आणि खर्च टाळावे.
४) भीमरूपी स्तोत्राचे १२०० पाठ दर वर्षी एकदा तरी करावेत. ६० दिवस रोज २० वेळा म्हणल्यास हे सहज शक्य आहे.
५) अमेथिस्ट क्रिस्टल ची अंगठी हातात जरूर घालावी

***शंतनू जोशी ***
ज्योतिषशास्त्र , अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र सल्लागार
पुणे

९५५२५९३९५१ - फक्त व्हॉट्स ऍप

No comments:

Post a Comment