१) दारू , बिडी सिगरेट विकणारे , मटण विकणारे , बार , पब चालवणारे , डान्स बार चालवणारे इत्यादी मंडळी ज्योतिष वास्तू बघत नाहीत तरी त्यांना फायदा होतोच कि. अश्या आशयाचे काही जोक्स मध्यन्तरी लोक(खुळचट) शेयर करत होते.
२) राजकारणी लोक ज्योतिष वास्तू मानत नाहीत तरी त्यांना फायदा होतो.
३) बिल्डर मंडळी मानत नाहीत.
४) इतर धर्मीय ह्या गोष्टी मानत नाहीत.
५) नास्तिक लोकांना ह्या असल्या गोष्टी करून काही नुकसान होत नाही . कसे काय ?
६) जैन , मारवाडी , सिंधी हे लोक कुलाचार कुलधर्म ज्योतिष वास्तू काही न मानता न करता पण त्यांचा धंदा चालतेच कि !
हे सगळे प्रश्न अनेकदा येतात. स्वतःला स्वतःच सभ्य समाज म्हणवून घेणारी मंडळी हे प्रश्ण विचारण्यात सगळ्यात पुढे असतात. स्वतःला विज्ञान अधिष्ठित म्हणणारे पण ह्यात असतात.
मी स्वतः गेली ५-६ वर्ष जो काही अनुभव घेतला तो ह्याचा १००% विपरीत आहे !
मी स्वतः हॅन्डल केलेल्या केसेस मध्ये राजकारणी मंडळी , बिल्डर्स , बार मालक , मटण विक्रेता, पोर्क विक्रेता , पब मालक , मुसलमान लोक , ख्रिस्ती लोक , पारशी , जैन मारवाडी , सिंधी , डॉक्टर , IT कंपनी मालक , बौद्ध लोक, सट्टा करणारी लोकं अश्या सर्व प्रकारची,सर्व जाती धर्माची आणि सर्व बॅकग्राऊंडची लोक आहेत. त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढ , पगार वाढ , आरोग्य , निवडणूक जिकणे इत्यादी विविध कारणान साठी सल्ले मागितले.
इतर धर्मियांनी लग्नासाठी गुण मिलन करवून घेतले. नामकरण करताना कोणते नाव योग्य ठरेल ह्या बद्दल माहिती घेतली.
विशेष म्हणजे ह्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी जास्ती मनापासून आणि लक्षपूर्वक केल्या. जास्ती पाल्हाळ लावली नाही. त्यांना मिळालेल्या परिणामान बद्दल न विसरता मला कळवले. स्वतःचे इतर अनुभव बाजूला ठेवून प्रोफेशनल पद्धतीने माझे सर्व सल्ले ऐकून फॉलो केले. एकवेळ मी पैश्यां बद्दल मागणी न करता सुद्धा चार वेळा विचारून देणे. उपायाचा प्रॅक्टिकल अर्थ मी नेहेमीच समजावून सांगतो तो ऐकून लक्षात ठेवणे आणि योग्य पद्धतींनी ती माहिती वापरणे. काळ वेळ आणि प्रोफेशनल boundaries चे भान ठेवणे. ज्योतिष आणि वास्तू मधून नेमकी काय अपेक्षा ठेवावी हे ह्या लोकांना पक्क माहिती असतं.
स्वतःला सब्भ्य , विज्ञान अधीष्ठीत वगैरे समजणाऱ्या दीड शहाण्या लोकांनचे अनुभव :
१) पाल्हाळ लावणे . प्रश्णच विचारता येत नाही. आपल्याला नक्की काय हवे आहे हे सुद्धा सांगता येत नाही.
२) सांगितलेल्या गोष्टी दिरंगाईने , अर्धवट आणि चुकीचा करून ठेवणे.
३) दुःखाचे रडगाणे सांगायला रोज फोन करून त्रास देणे , पण फायदा झाल्यास मेसेज करायची सुद्धा तसदी न घेणे . म्हणजे त्यांनी धन्यवाद करावा म्हणून नाही. सांगितलेल्या गोष्टींचा अपेक्षित परिणाम आला का नाही एवढी माहिती द्यायला सुद्धा लोक तसदी घेत नाहीत. नकारार्थी गोष्टी आवर्जून कळवतात. सकारात्मक गोष्टींन बद्दल मुळीच कळवत नाहीत.
४) समस्ये वर उपाय विचारणे . उपाय सांगितल्यावर त्या उपायाचे शॉर्ट कट विचारणे, आणि शेवटी सगळे सांगून सुद्धा सांगितलेली गोष्ट न करता रडत राऊतपणा चालू ठेवणे.
५) केलेल्या उपायान नंतर आलेली संधी स्वतःचा अहंकारा मुळे , आततायी निर्णयान मुळे , हलगर्जीपणा मुळे , समयसूचकता नसल्या मुळे घालवणे !
६) आपले काय ते शोधून करण्या पेक्षा दुसऱ्याचे काय आहे - नाही बघण्याची उकिरडी हौस असणे. आणि ह्याच अस झालं त्याचं असं झालं , तो नालायक असून पुढे गेला मी शहाणा असून माझे झाले नाही इत्यादी वल्गना करत बसणे.
७) १७६० ठिकाणी जाऊन एकच प्रश्ण विचारणे, ना ना तर्हेचे घोळ घालून ठेवणे. सांगितलेली स्वस्त , सोप्पी स्वतः करण्यासारखी गोष्ट न करणे. कुठले तरी टीव्ही , इंटरनेट वर मिळालेले खर्चिक उपाय करणे. परिणाम मिळत नाहीच . मग हे सगळं बंडल आहे , बोगस आहे असे म्हणणे.
८) आपले टाळके मध्ये घालणे , आणि आम्हालाच जास्ती कळतं असं म्हणत स्वतःचाच पायावर कुर्हाड मारून घेणे.
९) गुण मिलन होत नाही असे सांगून सुद्धा लग्न करणे, महिन्याभरात येऊन आमच पटावं म्हणून काही उपाय आहे का असे विचारणे.
:D१०) मूळ मुद्दा सोडून स्वतःचे चरित्र पूराण उगाचच पुन्हा पुन्हा सांगणे.
११) वेळेची कोणतीही बंधनं न पाळता रात्री बेरात्री फोन मेसेज करणे.
१२) सगळं मिळावं , ऐत मिळावं आणि फुकटच मिळाव अशी वेडी अपेक्षा करणे.
सरते शेवटी मुक्ख्य मुद्दा असा कि कोणत्याही क्षेत्रातल्या सगळ्यात टॉप ब्रास लोकं , यशस्वी लोकं जी आहेत त्यांच्यातली जास्तीत जास्ती लोक ह्या गोष्टी फॉलो करतात. आपल्याला हुशारीला आणि कष्टाला शक्तीची जोड देतात. राजकारणी असो , अभिनय क्षेत्रातली असो , मॉडेलिंग करणारी असोत, व्यावसायिक असोत , शेयर ट्रेडर असोत सर्व क्षेत्रातली मंडळी , यशस्वी मंडळी वरील शास्त्रान मध्ये/ कलान मधे विश्वास ठेवतात आणि त्यावर आधारित पावल उचलतात. अगदी अंबानी , मोदी , शहा , मल्ल्या, बच्चन , देवगण पासून सगळे लोक मानतात.
अजून एक गोष्ट. ज्योतिष आणि वास्तू ह्यांचा धर्माशी संबंध नाही ! श्रद्धा आहे का नाही ह्याच्याशी सुद्धा संबंध नाही !
ज्योतिष आणि वास्तू ह्यांचे आपले लॉजिक आहे , technique आहे , नियम आहेत. ते बरोबर समजून परफेक्टली फॉलो केले तर त्यांचे परिणाम निश्चित असतात. कोणत्याही लॉजिकल गोष्टी प्रमाणे ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा जादुई किंवा चमत्कारी नाहीत. त्यांची निश्चित कार्य प्रणाली आहे ! आणि ती विशिष्ट पद्धतींनी वापरली कि परिणाम १००% येतातच. ज्योतिष आणि वास्तू तुमचा श्रद्धेने नाही तर तुमचा कॉमन सेन्स आणि application प्रमाणे परिणाम देतात ! तुमचा श्रद्धा वगैरे गुंडाळून ठेवल्या तरी चालतील.
दोन्ही वेगवेगळे वाटले तरी तुमचा आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत आणि त्या मुळे दोन्ही एकत्रित वापरले तर आणि तरच ! १००% परिणाम मिळू शकतात. ज्योतिष हे future फोरकास्टिंग साठी आहे. उपाय सांगणे हा ज्योतिषाचा विषय नाही ! उपाय तंत्रावर आधारित आहेत ! वास्तू हे arrangement आणि designing चे शास्त्र आहे. इथे सुद्धा तंत्र हेच उपाय शास्त्र आहे.
कोणत्याही ग्रहाचा नावातले पहिले अक्षर घेऊन , त्यावर अनुस्वार लावून त्याला बीज मंत्र म्हणणारे वेडे लोक तंत्र कसं समजून घेणार !? ज्यांना तंत्र म्हणलं कि लिंबू मिरची , कवट्या आठवतात ते लोक तंत्र काय समजणार ! तंत्र म्हणजे technique , पद्धत , application ! इतका सोपा अर्थ आहे. तुमचा रोजचा आयुष्यातील सवयिंची, कामांची, विचारांची कार्यप्रणाली तंत्रानुसार थोडी थोडी बदलली तरी सुद्धा अनेक उपाय होतात. त्या ऐवजी लोकांना कुतुहला पोटी कुठलेतरी विचित्र टोटकेच करावेसे वाटतात. त्याला कोण काय करणार.
कोणत्याही लॉजिकल विज्ञान अथवा कले प्रमाणे इथे सुद्धा वापरणाऱ्या माणसाला R & D आणि practice हि करावीच लागते. आणि त्या नुसार प्रत्त्येक प्रॅक्टिशनरची पद्धत विकसित होते.
त्या मुळे आपल्या गरजा , लिमिटेशन्स वगैरे सर्व आधी नीट लक्षात घ्यावे त्या नुसार अपेक्षा आखाव्यात , मग इतर सर्व क्षेत्रान प्रमाणे योग्य माणूस शोधून काढा आणि मग योग्य ते सल्ले घेऊन त्यांची योग्य पद्धतींनी अम्मल बजावणी करा ! म्हणजे परिणाम १००% पक्का होणारच !
काळजी नसावी
शंतनू जोशी